Description
साहित्यातलं जीवन आणि प्रत्यक्ष जीवन यांत किती अंतर असतं? असू शकतं ? केव्हा तरी असंही घडतं की ही दोन अंतरं राखून असलेली जर्ग परस्परांवर येऊन आदळतात, परस्परांमध्ये मिसळतात आणि लेखक त्यात होरपळून जातो…
लेखकाने लिहिलेली कादंबरी मग बाजूला राहाते, लेखकाचं आयुष्य हीच संघर्षभूमी बनते. हा संघर्ष केवळ जगण्याचा नसतो. आपण लिहिण्याच्या फंदात पडतो तरी कशासाठी? कलेचं, साहित्याचं आपल्या आयुष्यात स्थान काय ? जीवनात निर्मितीला स्थान काय? अशा प्रश्नांनी तो भंजाळून जातो….
सध्या अवघ्या जगाला वेढून राहिलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवरची रमेश इंगळे उत्रादकर यांची ही कादंबरी मृत्यू-जाणिवेच्या छायेत कलानिर्मितीच्या प्रेरणेचा ठाव घेते आणि वाचकाला जीवन आणि कला यांच्यातल्या नात्याबद्दल अधिक अंतर्मुख करते.
नीतीन रिंढे






Reviews
There are no reviews yet.