Description
आजाराची साथ ही युद्धासारखी खवीस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय ? दैव म्हणजे काय ? मानव कुणाला म्हणायचं?
जेव्हा मृत्यू अनपेक्षित असतो तेव्हा त्याला सामोरं जाणं म्हणजे का वीरगती? मृत्यूची बाट पाहणं म्हणजे का बीरगती? मृत्यूची बाट पाहणं हा विचार करत राहाणं, किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या कुणाला मदत करणं, ही बीरगति ?
मृत्यू हा अटळ आहे. पण जेव्हा सगळ्यांचं जीवनच धोक्यात आहे तेव्हा ह्या अटळपणाचं काय करायचं ?
साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज बाचलो ह्याची बढाई मारायची की ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ?
ज्या साथीनं मानवी जीवनालाच धोक्यात टाकलंय ती साथच मानवी निष्काळजीपणाने येत असेल तर? म्हणजे ती कधी परत येईल ते सांगता येणार नाही. मग काय करायचं ?
मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतः बरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाही.
आपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.






Reviews
There are no reviews yet.