arrow_back Back to Books
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे दुर्मिळ वाड्मय खंड तिसरा

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे दुर्मिळ वाड्मय खंड तिसरा

Dinmitrakar Mukundrao Patil Yanche Durmil Wangmay Khand 3

storefront Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
qr_code ISBN: 9788197753268
calendar_today 2026
menu_book 552 pages
layers First Edition
₹276
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या साठ सहकाऱ्यांसह १८७३ मध्ये स्थापन केलेल्या मानवतावादी 'सत्यशोधक समाजा'च्या जडणघडणीत कृष्णराव भालेकर यांचाही मोलाचा वाटा होता. मुकुंदराव पाटील हे याच कृष्णराव भालेकरांचे सुपुत्र कृष्णराव भालेकरांना दिलेल्या वचनानुसार मुकुंदरावांनी सोमठाणे येथून शिदोरे बंधूंच्या सहकार्याने 'दीनमित्र' हे सत्यशोधकीय साप्ताहिक १९१० मध्ये पुन्हा सुरू केले, व ५८ वर्षे अविरतपणे चालविले. या सत्यशोधकीय पत्राने आपल्या उद्दीष्टांनुसार बहुजनांच्या समस्यांना मुखर करत समाजामध्ये सत्यशोधकीय विचारांची पेरणी केली. मुकुंदरावांनी या पत्रातून शिक्षणाचा जागर केला. बहुजन समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मुकुंदरावांनी अग्रलेखांच्यासोबत विविध सदरांमधून व साहित्यप्रकारांमधून लेखन केले. मुकुंदरावांचे हे साहित्य आजही समकालीन ठरते. असे हे मौलिक साहित्य बराच काळ अनुपलब्ध होते. आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने हे सत्यशोधकीय साहित्य प्रकाशित होत आहे. वाचक त्याचे नक्कीच स्वागत करतील, असे वाटते!


उत्तमराव माधवराव पाटील


मुख्य संपादक

Book Images

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like