या पुस्तकाविषयी
१४ कथांच्या या संग्रहात विषयांचं भरपूर वैविध्य आहे. ग्रामीण बाज आहे, दुःख आहे, वेदना आहे, मैत्री आहे, तीही दोन विभिन्न धर्मातल्या दोन पुरुषांमधली तसंच एका संस्थानिक घराण्यातली मुलगी आणि सामान्य घरातल्या मुलामधली, शाळकरी मुलांमधली, मैत्रीची ही वेगवेगळी रूपं मोहित करणारी आहेत. शिक्षणाची आस असलेल्या एका आईनं आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आहेत. यातल्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या कथांमधले तपशील अगदी अस्सल आहेत, तसंच मुंबईच्या चाळीतल्या जगण्याचे सुद्धा. ते ते वातावरण उभं करण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो. तीच गोष्ट संवादाची, शाळकरी वयातले मित्रांमधले संवाद असोत वा ग्रामीण भागातले नवरा बायकोचे, बाप लेकातले असोत, ती पात्रं आपल्या समोरच बोलताहेत असं वाटतं.।
नीलिमा बोरवणकर
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
हे देखील पाहा
घडामोडी आणि सन्मान
प्रकाशन सोहळा
घुंगरकाठी कथासंग्रहांचा प्रकाशन सोहळा
डॉ. (नरु) भाऊ कदम यांच्या ‘घुंगरकाठी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा ३० ऑगस्ट २०२६ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, नेरूळ येथे संपन्न…
कोळी संस्कृती भवन, नेरूळ ,मुंबई